У нас вы можете посмотреть бесплатно संत मोरया गोसावी | Life of Ganapati Bhakta Sant Morya Gosavi или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
"गणपती बाप्पा मोरया। गणेश भक्त संत मोरया गोसावी यांची कथा बघा।" मोरया गोसावी महाराज हे १४व्या शतकातील गाणपत्य संप्रदायातील संत होते. ते मोठे गणेशभक्त होते. मोरया गोसावी महाराज मोरगावहून चिंचवड येथे जाऊन स्थायिक झाले. तेथे त्यांनी गणपती मंदीर उभारले. सुत्रधार मधली आजची प्रस्तुती मोरया गोसावी यांना समर्पित आहे. कर्नाटकातल्या बिदर जिल्ह्यात शाली नावाचे गाव आहे. त्यात वामनभट्ट शाळिग्राम आणि पत्नी पार्वतीबाई नांदत होते. वामनभट्ट श्रुतिस्मृतिपुराणोक्त गृहस्थाश्रमाचे काटेकोर पालन करत होते. अर्धे अधिक आयुष्य लोटले तरी पुत्रसंतान नाही म्हणून उदास झालेले वामनभट्ट घर सोडून निघाले. पत्नी बरोबर मजल दर मजल प्रवास करत मोरगावला आले. कऱ्हेच्या पठारावर विराजमान झालेल्या मोरयाला पाहून त्यांचे चित्त विराले. त्यांच्या खडतर तपश्चर्येवर मोरया प्रसन्न झाला आणि त्यांच्या पोटी पुत्र जन्माला आला. त्याचं नाव त्यांनी अजन्मा असं ठेवलं. अजन्मा लहानपणापासूनच गणेशभक्तीत रमला होता.गणेशच्या आराधनेत मग्न असता त्याची भेट योगिराज नयनभारती गोसाविनशी झाली. पुढे त्यांच्या उपदेशाने मोरयाने मुळामुठेच्या काठी थेऊरच्या जंगलात चिंतामणीची घोर तपश्चर्या केली. बेचाळीस दिवसांच्या कठोर अनुष्ठानाने चिंतामणी प्रसन्न झाला. मोरया गोसावी बनले. शतदम संपन्न गोसावी अष्टसिद्धी प्राप्त करून मोरगावला आले. त्यांच्या सिद्धी गोरगरिबांच्या, दीन दुबळ्यांच्या संकट निवारणासाठी राबू लागल्या.त्यांच्या पायाशी येऊन लोक कृतकृत्य होऊ लागले. पण आता मोरया गोसवींना ध्यानधारणेला वेळ मिळेना. एक दिवस त्यांनी ध्यान करून गणपतीला आपली ही समस्या सांगितली. विनायकाच्या संकेतानुसार मोरगाव सोडून मोरया गोसावी चिंचवड जवळच्या उपवनात जाऊन एकांतात ध्यानधारणा करू लागले.चिंचवडकरांना हे समजताच त्यांनी त्यांना गावात आणले आणि तिथे एक झोपडी बांधून दिली. त्यात राहून मोरया गोसावी सेवा करू लागले. प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेला ते चिंचवड सोडत आणि मजल दर मजल करत मोरगावला जात. चतुर्थीला मोरयाची पूजा करत. पंचमीला पारणे करून चिंचवडला परत येत. कितीही अडथळे आले, संकट आली तरी मोरया गोसाविंनीआपल्या पूजेत कधीही खंड पडू दिला नाही. एकदा कऱ्हेला पूर चढला. पाण्याला खूप ओढ होती. तेव्हा एका कोळ्याच्या पोराचे रूप घेऊन साक्षात गणपती तिथे आला.आणि त्याने मोरया गोसाविंना कऱ्हेपार केले. एकदा उशीर झाला. देऊळ बंद करून गुरव घरी गेले. मोरया गोसावींची पूजा अंतरायची पाळी आली. मोरया गोसावी तरटीपाशी बसून मोरयाला आळवू लागले. त्यावेळी साक्षात गणपती त्यांच्यासाठी देवळाबाहेर आला आणि त्याने मोरया गोसाविंच्या पूजेचा स्वीकार केला. हळूहळू चिंचवडचा पसारा वाढला. गर्दी वाढू लागली. मोरया गोसवींच्या माहा त्म्याने चिंचवड गजबजू लागले . गेली काही वर्षे मोरया गोसावी देहीच विदेही अवस्था भोगत होते. ते अखंड आत्मानंदात रमलेले असत. जनसंपर्कामुळे त्यांच्या साधनेत व्यत्यय येऊ लागला.त्यांनी मयूरेश्वराचा धावा केला," हे ईश्वरा, मयूरेश्वरा, मला आता गुप्तवास करण्याची, समाधी घेण्याची इच्छा आहे. त्यामुळे मला अखंड अद्वैत अवस्था भोगता येईल." मयूरेश्वर म्हणाले "अरे तू आणि मी दोन नाहीत. आपण एकच आहोत. मी अखंड तुझ्या हृदयात निवास करीन. जा, तुझ्या इच्छेप्रमाणे सर्व गोष्टी घडतील." असा आशीर्वाद देऊन मयूरेश्वर अंतर्धान पावले. समाधानाने व तृप्तीने त्यांनी जिवंत समाधी घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपला विचार आपल्या मुलाला चिंतामणीला सांगितला. त्यांना अतिशय दुःख झाले.पण तरीही वडिलांच्या आज्ञेप्रमाणे पवना नदीच्या काठावर एक पवित्र भूमी पाहून त्या ठिकाणी समाधीसाठी त्यांनी गुंफा तयार केली. मार्गशीर्ष वद्य षष्ठी शके १४८३, साल १५६१ हा उत्तम दिवस पाहून श्री मोरया गोसावी घरून निघाले. देवळी आले. त्यांच्या बरोबर चिंतामणी महाराज, दोन सुना, नातवंडं असा परिवार होता. गावातले अनेक लोक आधीच घाटावर येऊन बसले होते. सगळीकडे मोरया नामाचा गजर सुरू होता. मोरया गोसावींनी स्नान केले. पूजा केली. धौतवस्त्र परिधान केले. मोरया गोसावी गुंफेत उतरले. एक-दीड परस खोलीची गुंहा होती. दहा हात लांब, दहा हात रुंद चिरेबंदी पाषाणांनी बांधून काढलेली. मधोमध पाषाणाचा चौरंग, त्यावर आसन, पुढे एक चौरंग, त्यावर गणेशपुराण, दोन्ही बाजूला दोन समया तेवत होत्या. मोरया गोसावी आसनावर बसले. चिंतामणी महाराजांनी त्यांच्या गळ्यात फुलांचा हार घातला. सुनांनी औक्षण केलं. सगळेजण पाया पडत होते. बघता बघता मोरयांची समाधी लागली. नजर दोन भुवयात स्थिरावली. शरीर ताठ झाले. प्राण ब्रह्मरंध्रात येऊन राहिले. चित्त चैतन्याकार होऊन ते आत्मानंदात निमग्न झाले. चिंतामणी बाहेर आले. एक प्रचंड शिळा उचलून त्यांनी गुंफेवर ठेवली. चितामणी महाराजांनी समाधीवर सिद्धिबुद्धिसहित मोरयाची मूर्ती बसविली. समाधीकडे जायचा रस्ता होता, त्यावर अर्जुनेश्वराची मोठी शाळुंका स्थापन केली. हे समाधिस्थान जागृत आहे. आणि आजही विविध प्रांतातून अनेक भक्त इथे दर्शनाला येतात. त्यांना साक्षात्कार होतो आणि प्रचिती येते. #marathi #bhakti #ganesh #ganpatibappamorya #ganpati